शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:49 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुढील हंगामासाठी (२०१८-१९) उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्याने ‘एफआरपी’ची रक्कम तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.शेतकºयांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर व साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालून उसाची एफआरपी निश्चित करण्याचे काम केंद्रीय कृषिमूल्य आयोग करतो. साधारणत: बाजारपेठेतील साखरेच्यादराचा ठोकताळा बांधूनच हा दर ठरविला जातो. हंगाम २०१५-१६ मध्ये ९.५ टक्के साखर उताºयाला २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २४८ रुपये ‘एफआरपी’ निश्चित करण्यात आलीहोती. दुसºया हंगामासाठी ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याची मागणी शेतकरीसंघटनांनी केली होती; पण बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता ‘एफआरपी’मध्ये बदल झालाच नाही. सलग दोन वर्षे एकच ‘एफआरपी’ राहिली. त्यानंतरच्या २०१७-१८ (म्हणजेच चालू हंगामासाठी) ‘एफआरपी’मध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ९.५ साखर उताºयासाठी २५५० रुपये; तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास २६८ रुपये अशी एफआरपी मिळणार आहे. यंदाचा हंगाम अजून सुरू व्हायचा आहे. ऊसदराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. वाढीव एफआरपी व शेतकरी संघटनांची मागणी यामध्ये सरकारला तडजोड करावी लागणार आहे. तोपर्यंत पुढील हंगामासाठी (२०१८-१९) प्रतिटन दोनशे रुपयांच्या वाढीची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ९.५ साखर उताºयाला २७५० रुपये तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये वाढ मिळणार आहे. त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’ तीन हजार रुपयांच्या पुढेच जाणार आहे.चढ-उतार निधीची पुन्हा मागणीबाजारातील वर्षभरातील साखरेच्या दराचा अंदाज गृहीत धरून ‘एफआरपी’ काढली जाते. त्यामुळे पुढे दर कोसळले तर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये जातात. यासाठी साखर चढ-उतार निधीची संकल्पना कृषिमूल्य आयोगाने आणली होती, त्याला केंद्राने मंजुरी दिलेली नाही.कशी ठरविली जाते ‘एफआरपी’...शेतकºयांचा उसाचा उत्पादन खर्चआंतर पिकांपासून घेतलेले उत्पन्नसाखर कारखान्यांचा उत्पादन खर्चबाजारातील साखरेचा सरासरी दरग्राहकांना कमीत कमी दरात साखर मिळाली पाहिजे.अशी राहिली एफआरपीहंगाम ९.५ उताºयाला त्यापुढील२०१५-१६ २३०० रुपये २४८ रुपये२०१६-१७ २३०० रुपये २४८ रुपये२०१७-१८ २५५० रुपये २६८ रुपये२०१८-१९ २७५० रुपये २८० रुपये

टॅग्स :agricultureशेती